सुजित झावरे पाटील यांचे हस्ते भाळवणी येथे शनी देवाची महाआरती
लिंक मिळवा
Facebook
X
Pinterest
ईमेल
अन्य अॅप्स
दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी
पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे श्री शनी अमावस्या निमीत्ताने शनिदेवाची महाआरती सुजित झावरे पाटील यांचे हस्ते करण्यात आली.
यावेळी सुजित झावरे पाटील यांनी सभामंडप देण्याचा शब्द दिला व लगेच नारळ फोडून सदर सभामंडपाचे भूमिपूजन देखील करण्यात आले. यावेळी भाळवणी परिसरातील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थितीत होते.
कोतुळेश्वर विद्यालयात रविवारी माजी विद्यार्थी स्नेहमेळावा! कोतुळ दि 21 रयत शिक्षण संस्थेच्या कोतुळ( ता अकोले) येथील कोतुळेश्वर विद्यालयात शिक्षण घेऊन सन. १९७८ या वर्षात १० वी च्या बॅच मधून बाहेर पडलेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा रविवारी आयोजित केला आहे रयत शिक्षण संस्थेच्या कोतुळेश्वर विद्यालय कोतुळ या विद्यालयात या विद्यार्थांचा स्नेहमेळावा रविवार दि २५/१२/२०२२ रोजी आयोजित केला आहे. शाळेतील जुने बालमित्र विद्यालयात एकत्र येऊन एकमेकांच्या भेटी गाठीतून गप्पा मध्ये रंगणार आहेत यावेळी माजी विद्यर्थांकडून गुरूपूजन करण्यात येणार आहे त्यानंतर सर्व जुन्या मित्रांना उद्योजक माणिकराव देशमुख यांचे फार्म हाऊस येथे स्नेहभोजन घेत जुन्या आठवणींना उजाळा दिला जाणार आहे कोतुळेश्वर विद्यालय कोतुळ या विद्यालयातून सन १९७८ साली वर्षात दहावी तुन बाहेर पडलेल्या इ.१० वी बॅच च्या...
नाशिक - महाराष्ट्र सरकारने अधिसंख्य पदाच्या नावे बोगस आदिवासींना संरक्षण देत खऱ्या आदिवासींवर अन्याय केला आहे. आदिवासींसाठी राखीव असलेली सुमारे एक लाख शासकीय आणि निमशासकीय पदे रिक्त आहेत. असे असताना सुमारे तेरा हजार पदांवर बोगस आदिवासींची भरती करण्यात आली आहे. या बोगसांची हकालपट्टी करून त्या जागी खऱ्या आदिवासींची तातडीने भरती करा. अन्यथा ३ फेब्रुवारी रोजी नंदुरबार येथे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावीत यांच्यावर भव्य मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा 'आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंच' ने दिला आहे. मंगळवार, दि. ३ जानेवारी रोजी नाशिक येथे अधिकार मंचच्या बैठकीत हा इशारा देण्यात आला. या बैठकीत आदिवासींचा रोजगार आणि शिक्षणाच्या प्रमुख मागण्यांसोबतच इतर प्रश्नी चर्चा करण्यात आली. बैठकीत शिंदे-फडणवीस राज्य सरकारच्या आदिवासी विरोधी कारभाराविषयी तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. घटनेने दिलेल्या रोजगार , शिक्षण आणि उपजीविकेच्या अधिकारांसाठी राज्यव्यापी प्रखर आंदोलन करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. या आंदोलनात आदिवासींच्या न्याय्य हक्कांसाठी लढणाऱ्या सर्व संघटनांची एकजूट उभ...
सामाजिक संघटन वाढले पाहिजे त्याने समाजाची ताकद वाढते त्यामुळे राजकारण सुद्धा जवळ येते असे प्रतिपादन माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप यांनी केले *सटाणा तालुक्यात राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या नामफलकांचे अनावरण नाशिक दि1 सामाजिक संघटन वाढले पाहिजे त्याने समाजाची ताकद वाढते त्यामुळे राजकारण सुद्धा जवळ येते असे प्रतिपादन माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप यांनी केले सटाणा तालुक्यात मुंजवाड , टेंभे वरचे ठेंगोडा या ठीकाणी राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या नामफलकांचे अनावरण माजी समाज कल्याण मंत्री मा.बबनराव घोलप व राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बबनराव घोलप म्हणाले की समाजाने एकत्र येउन संघटन करून राहिले पाहिजेत.त्यापासुन समाजाची ताकद दिसते. ज्यापासुन राजकारण सुद्धा जवळ येते.शासनाच्या योजना वेळेवर मिळतात. या समाजाच्या प्रगतीला छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन थोर विभुतींचे आशिर्वाद आहेत. राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे नाशिक उपजिल्हा प्रमुख साहेबराव सोनवणे यांनी मुंजवाड येथे शा...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा